Tuesday, February 21, 2012

as kahi tari .. lihat gelel..

आता इथेच थांबावे ....

कधी तरी वाटत .. खूप जगेल आयुष्य ..
उरले नाही काही .. अजून अनुभवायला..
क्षण क्षण असा.. आठवणीत आहे माझ्या ..
जसा जिवंत भूतकाळ .. वर्तमान मध्ये रंगलेला..

असे वाटत तुझ्या सवे जगताना..
हे क्षण पाण्यासारखे गरठावे..
त्या बर्फ झालेल्या क्षणांना ..
मी स्पर्शून हुर्हुरावे ...

कधी तरी वाटत .. हा प्रवास संपूच नये..
तू हातात हात घेऊन चालताना..
पाऊल कधी थांबूच नयेत ...

आता पुढे प्रवास करताना फक्त तुझी साथ हवी.
नको संपूर्ण आयुष्य मला..
पण क्षणा क्षणात तुझी  साद हवी ..

असे जगले मी ..तुझे सवे जगताना..
जसे दवाचा आयुष्य लाभते त्या पानांना..
रुपरंग गुलमोहराचे होते सोबती माझ्या
गंध प्राजक्ताचा आणि उफान्लेल्या लाटा..
 चांदणे हि लाजले होते बघून मिलनाच्या राती..
हि दृष्ट त्या चंद्राची .... तुटल्या जन्मांच्या गाठी
  =============

सुना था कभी दर्द का कोई इलाज नहीं होता..
नासूर है जख्म ये इनका दर्द नहीं होता..
फिर क्यों आज लफ्ज़ तेरे यु जज्बातों से खेल जाते है..
कभी दवा बन सुकून देते है
...... कभी दिल पर वार कर जाते है ..

लबो की हसी देख ली .. नम आंखे भी पहचान ली होती..
लौटने से पहले ..हालत दिल की जान ली होती..
खैर कोई बात नहीं ..खुदा रहमंत बरसे..
तू जहा भी जाये .. बस खुशियाँ ही पाए ...
===========================================
कसे असावे.. कसे नसावे ..
सांगणारे बहुत मिळाले ..
जसे असावे .. तसे जगावे ..
अस कोणी बोललच नाही ...
=======================================

जगावे असे कि श्वासाला अभिमान व्हावा ..
यमाच्या पदरातून प्राण त्याने हिसकाव ..

वांझ नाही कल्पना त्यांना हि फुलू द्या
एक बीज कल्पनेचा मातीत मेंदूच्या मुरु द्या ...

जिने असे कि सार्थक का जन्म व्हावे ..
जेव्हा मिटतील डोळे  स्वर्गातून यान यावे ...
======================================================
======================================================
स्वप्न बघ कसे उडू लागले..
कल्पनाच्या बघेत फुलू लागले..
अभिलाशेच्या हिंदोळ्यावर ..
बघ कसे झुलू लागले..
वाऱ्यासंगे डोलत आहे..
लाटांवर त्यास तोतल आहे ..
जरी कांचेसम रूप त्यांचे ..
तरी मनसोक्त भिरभिरत आहे ..
निजलेल्या पापण्यांना ..
बघ किरणांची जगवले..
नव्या पहाटे स्वप्नाचे ..
घर पुन्हा आठवले..
======================================================
======================================================
विचारांचे मनात  द्वंद असावे
मेंदूशी त्यांचे भांडण असावे

शब्दांचे मोकळे अंगण असावे
भावनांचे त्यात प्राजक्त पडावे

अश्रुना नाही कुठे हि वाट
ओठांवर फक्त स्मित सजावे 
स्पंदने चालता म्हणून जगणे नाही
जीवनात नेहमी संघर्ष असावे
मोल नाही इथे प्रेमाचा
नात्यांमध्ये असे बंध असावे
उंच उडण्यास पंख नाही
आत्मशक्तीचे पाठबळ असावे
तुटलेल्या स्वप्नांना
काटेरी कुंपण असावे ..
श्वासाचा गणित मांडतांना
प्रत्येक श्वास जगण्याचे धडे सांगावे ...
=======================================

इथे असेच चलते ..

पदोपदी विवेचना
विडंबना हि जोहते
तरी पुन्हा विचार हे
नवी दिशा शोधते  ...

जीर्ण्य जरी जाहल्या
उरी आज वेदना
तरी पुन्हा रुंदन हे
चिंब भिजवून जाते ..

आधी नाही अनादी आहे
नशीबाचे खेळ हे
काल जे अनुबंध इथे
आज ऋण मागते ..
 =============================
 
किती अजून दाबून धरशील हुंदका उरी 
कर प्रहार शब्दांचा हे शब्दच तुझे वैरी ..

उधळण निसर्गाची रमणीय कशी ..
सजली धरणी जणू नववधु जशी
कुठे शोधीशी काशी धरातलावर वेड्या..
मातीच्या सुगंधात स्वर्गाची वारी ...
==========================================================

फुलां मागे काट्याचे असणे.. तीरा मागे लाटेचे धावणे ..
क्षितिजाची ओढ पाखरांना .. मृगजळाचे खेळ वाटसरूंना ...
रहस्य जीवनाचे लपले कुठे कसे , कधी कोणी शोधले काय ??

ललाटरेषा  कधी कुणास उमगल्या काय ..??
===========================================================

कळी  उमलणार .. फुल बनून सुगंध दरवळणार ..
तो भृंगा येणार आणि स्वप्न तिचे तोडून जाणार..
आमचे अस्तिव जरी नसले तरी हे क्रम बदलणार का ??

ऋतुचक्र चालणारच.. उन्हाळा हिवाळा पुन्हा पावसाला ..
श्रावणाच्या सारी.. वसंताची मंद मंद स्वारी ..
चातकाच्या प्रतीक्षेत शिशिराचे आगमन
आमचे अस्तिव जरी नसले तरी हे क्रम बदलणार का ??
===================================================

सिक्का उछाल के ..
 क्या सच और झूठ का पता चालता है ..
क्या किसी के नसीब का दरवाजा खुलता है ..
फिर क्यों लोग कहते है .. देखे कौन जीतता है बाज़ी ..
सिक्का उछाल के ....
किसी की हार .. किसी की जीत ..
सिक्के की किसमत ही फूटी ..
साथ देना चाहो जिसका
उससे ही बैठी है रूठी ..
फिर बोलो कैसे ये खेल खेला जाता है..
कैसे किसमत का फैसला होता है ..
सिक्का उछाल के  .
.===================================

पाझरत जावे डोंगरातून .. निर्मल शीतल झरे बनून ...
मग त्या शीतल झऱ्यांची नद होईल .. वाहून येईल चराचरातून ..
मग .. तहानलेली सृष्टी सारी.. वर्षावाने नाहून जाईल ...
मग ... पुढे प्रवास त्या झर्याचा डोंगराच्या कपारीतून ..सागराच्या पायाशी ..संपेल इथेच सर्वस अर्पुन
मनाचे हे मृगजळ खरच कधी कळेल का कुणा ?
क्षणिक सुखासाठीँ... व्यर्थ भरकटत राहतो पुनःपुन्हा !
.
मनाचे भाव सख्या हिंदोळ्यावर झुले ..
जसे मळ्यामध्ये पिकं वाऱ्यावर डोळे ...

गेले आले दिवस विसरून जायचं ..
जगाचे तेच जे डोळ्या पुढे दिसायचं  ..

=============================================================



No comments:

Post a Comment